
लातूर,दि.07(मिलिंद कांबळे)
पुरुषाप्रमाणे स्त्रीयांनाही समानतेच्या मार्गांवर आणण्यासाठी तथागतांनी भिक्षुणी संघ स्थापन केला. पुरुष सत्ताक समाजात स्त्रीयांसाठी हे काम इतके सोप्पे नव्हते तथागत भ. बुद्धानीं स्त्रियांच्या मुक्तीसाठी आणि त्यांना सन्मान पूर्वक दर्जा देण्यासाठी धम्म ऊपदेश केला. त्यामुळेच तथागत भ.बुद्ध हे स्त्री समानतेचे पुरस्कर्ते होते.असे प्रतिपादन केशव कांबळे यांनी केले.
ते बुद्ध धम्म वर्षावास पुनीत पर्वाच्या निमित्ताने वैशाली बुद्ध विहार बौद्ध नगर लातूर येथील आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उपासक-उपासिकांच्या वतीने तथागत भ. बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प व पुष्पमाला अर्पण करून बुद्ध वंदनेने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि, तथागत बुद्धांनी महाप्रजापती गौतमी यांच्या विनंतीवरून स्त्रियांना संघात प्रवेश दिला आणि भिक्षुणी संघाची स्थापना केली, ज्यामुळे स्त्रियांनाही निर्वाण प्राप्तीचा मार्ग मिळाला.
त्यांनी स्त्रियांना व पुरुषांना बरोबरीचा दर्जा दिला.बुद्धांनी आपल्या शिकवणुकीने समाजात मोठे बदल घडवले, ज्यामध्ये जातीव्यवस्थेचे उच्चाटन आणि स्त्रियांच्या हक्कांचा समावेश होता.भगवान बुध्द हे समाजसुधारक होते. ज्यांनी प्रथम स्त्री-पुरुष समानतेचा जोरदार पुरस्कार केला.
भ. बुद्धाने स्त्री-पुरुष समतेच्या विचारातून प्रजापती गौतमीसह पाचशे स्त्रियांचा भिक्खुनीसंघ स्थापन करून स्त्री पुरुष विषमतेला गाडून स्त्री-पुरुष समतेचा विचार या देशात पहिल्यांदा मांडला. म्हणून भाद्रपद पौर्णिमा ही खऱ्या अर्थाने स्त्रियांचा सन्मान करणारी ठरते असेही त्यांनी यावेळी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, भगवान बुद्ध हे स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते ठरले राजा प्रसेनजित हा मुलगी झाल्याचे कळतातच खिन्न झाल्याचे पाहून भ. बुध्दानीं खिन्नतेचे कारण राजाला विचारले तेव्हा राजा म्हणाला भगवान मला कन्यारत्न झाले.
तेव्हा भगवंत म्हणाले राजा पुत्रापेक्षा कन्या कधीही श्रेष्ठ असते ती सद्गुणी कन्या ,पत्नी ,माता आशा भूमिका साकारणारी असून पराक्रमी पुरुषांना जन्म देणारी असते असा उपदेश करून मनाला सन्मार्गावर लावून प्रजाजनावर जुलुम न करता प्रेम आणि करुनेने राज्य करावे असा उपदेश केला म्हणून भगवान बुद्धाचा स्त्री सन्मानाचा, प्रेम व करुणेचा विचार धारण करून सन्मार्गांनी माणसाने जीवन जगावे हा बुद्ध विचार समाजात रुजण्यासाठी बुद्ध विचाराचे श्रवण करून माणसाने सुखी व्हावे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
कार्यक्रमास राशन दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष किशोर गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या. राजू कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
मिलिंद कांबळे
मो. 9960049411
ई-मेल milind.kamble9960@gmail.com